बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

भूकंपाच्या कविता

llभूकंपाच्या कविता ll

ll1ll

सारे भूकंप आता,
मसणवटा करणरे.
सारे जीव आता,
जीवनवाटा शोधणारे.

ll2ll
धरतीच्या अंगावरील,
झाली पीकांची आबाळ.
दारात मरणाच्या,
कुणा शोधतो बाळ?

ll3ll

जीवघेण्या भूकंपाची,
जीवघेणी थथर.
विसावल्या जीवाला,
नव्या पहाटेची फिकीर

ll4ll

धरतीत गडप झाला,
गावदेवाचा कळस.
लावू कुणाच्या दारात,
माझी मी तुळस?

ll5ll
भूकंपाच्या धक्कयाने,
नवसंसारांची लावली वाट.
आता कधी येणार?
उद्याची पहाट?

ll6ll

पोरक्या या गावात,
कुणा देवू मी धीर?
माझ्याही तिरडीला,
आता कितीसा उशीर?

ll7ll
थरथत्या काळोखात,
नको तुझी गं अनुकंपा.
किती दाबू मी आता,
काळजाच्या भूकंपा.

ll8ll

असा यावा पुन्हा भूकंप,
सारी व्हावी माती.
मग कोण विचारील,
कोण कुणाच्या जाती?

ll9ll

काय काय सांगू,
भूकंपाच्या कथा?
कशा कशा आवरू?
घरा-घराच्या चिता.

ll10ll

अरे भूकंपा भूकंपा,
आता नको पुन्हा येवू!
किती जेवलास आता?
दहाव्याची वाट नको पाहू !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा-9923847269
12ऑक्टोबर1993

(30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारीचा भूकंप झाला त्यानंतर विविध दैनिकात आलेल्या फोटोंचा आधार घेऊन लिहि