कवितांचा गर्भपात
कविता जन्माला येत नाहीत
पूर्ण दिवस भरल्याशिवाय.
कविता घेतात त्यांचा पूर्ण काळ.
कविता लिहिण्याऐवजी
जेंव्हा कविता पाडली जाते,
खरं तर
हाच कवितांचा
गर्भपात असतो.
अशा गर्भपातीत कविता पाहिल्या की,
वाटते कवितांची भ्रूणहत्या....
थांबायला हवी !
नाहीतर नाळ
उगीच पुन्हा पुन्हा तोडावी लागते.
चला कवितांचे गर्भपात
आपण थांबवुयात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा